वसई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील उजाणपुलाच्या खालीअसलेले छेदरस्ते वाहनांच्याअवैध पार्किंगचेअड्डे बनले आहेत. वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष झाले असून वाहनांच्या पार्किंगमुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वसई तालुक्यातून घोडबंदर ते पारोळपर्यंत जाणाऱ्या या महामार्गावर १२ उड्डाणपूल असून सातिवली फाटा, वसई फाटा, विरार फाटा, शिरसाड फाटा या उड्डाणपुलाखालीअसलेल्या छेदरस्त्यांवर वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून दुचाकी व चार चाकी वाहने पार्क केली जातात. वसई फाटा येथे तर रिक्षा आणि अवजड वाहनांची पार्किग केली जाते. त्यामुळे या छेदरस्त्यांजवळ नेहमी वाहतूक कोंडी होत असते. मुंबईच्या दिशेने जाताना अथवा मुंबईतन वसईत दाखल होताना या छेदरस्त्यांचा वापर करावा लागतो. पण या छेदरस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने उभी असल्याने अनेकवेळा किरकोळ अपघात घडत असतात. तसेच रात्रीच्या वेळीअंधारात ही वाहने दिसत नसल्याचे अनेक वाहनचालकांनी सांगितलेउजाणपुलांखालील छेदरस्त्यांवर वाहने पार्क करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी वाहनचालकांकडन करण्यात आली आहेवाहतूक पोलीस नियमित अशा उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करतातपणअनेकवेळा कारवाई करूनही वाहने उभी राहतात. पोलीसबळ कमी असल्याने कारवाईची गती कमी झाली आहे. पण आम्ही नियमित कारवाई करून अशा वाहनांकडनदंड वसूली करत आहोत.- विलास सुपे, वाहतूक पोलीस निरीक्षक, वसई
उड्डाणपुलांखालील जागेत अवैध पार्किंग वाहतूक पोलिसांचेदुर्लक्ष; अपघाताची शक्यता