ठाणे, (जिमाका): सोशल मीडियाच्या माध्यमातन प्रत्येक जण व्यक्तहोत असतो . हे करत असताना आपण काय पोस्ट करतो यामळे सनजत काय संदेश जाईल व याचे काय परिणाम होतील याचा सारासार विचार प्रत्येकाने करावा. सर्व समाज माध्यमांचा वापर करताना जबाबदारीचे भान बाळगणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पोलिस निरीक्षक बाळकष्ण वाघ यांनी केले. डोंबिवली येथील मॉडेल कॉलेज येथे जिल्हा माहिती कार्यालय व पोलिस विभाग सायबर सेलच्या वतीने आयोजित 'सायबर सेफ वुमेन' या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी मंचावर पोलिस निरीक्षक अभय धुरी, सहायक आदिती भालके, प्राचार्य विजय भोले आदी उपस्थित होते. श्री वाघ म्हणाले कि समाजमाध्यमे संपर्काची प्रभावी माध्यमे असून समाजमन घडविण्याची ताकद या माध्यमांमध्ये आहे. हे जरी सत्य असले तरी सोशल मीडियावर आपण जे काही व्यक्त होतो किंवा अपलोड करतो ते सर्व योग्यच आहे, असा भ्रम बहुतांश लोकांना असतो. या माध्यमातून आपण लोकांना आपल्या व्यक्तिगत आयुष्यात डोकावण्याची संधी देत असतो. याचे अनेक दुष्परिणाम होतात. याची जाणीव नसल्याने या माध्यमाचा सरस वापर होतो आहे. मोफत उपलब्ध होणा- या गोष्टींमध्ये नक्कीच काहितरी गडबड असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काही समाजकंटक अशा माध्यमातून गैरप्रकार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशावेळेस आपली सदसदविवेकबुध्दी वापरून आपल्या डिवाईसवरून किंवा डाटावरून काही गैरप्रकार तर होत नाही ना, याची काळजी नागरिकांनी घ्यावी. सोशल मीडिया वापरतांना आपली जबाबदारी काय, हे नागरिकांनी लक्षात घ्यावे. आपण वापरलेल्या डीजीटल फुटप्रिंट पोलिसांकडे लवकर उपलब्ध होतात. सायबर गुन्हे उघडकीस आणणे कठीण राहिले नाही. तुमचा डाटा सर्वकाही सांगतो. तो नष्ट होत नाही. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल किंवा एखाद्याच्या भावना दुखावतील अशा पोस्ट नागरिकांनी करू नये, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी सायबर गुन्ह्यांबाबत विविध उदाहरणे दिली. 'सायबर सेफ वुमेन' या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास नगरसेवक ज्योती मराठे, माजी नगरसेवक शिल्पा शेलार मंगल सुळे सामाजिक कार्यकर्त्या अर्चना पाटे, सुरेखा पांडे, नीता गावास श्रीमती गमरे यासह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोशल मीडिया वापरतांना जबाबदारीचे भान ठेवा